Posts

संवाद लेखन - तो आणि ती

संवाद लेखन - तो आणि ती लेखन - चेतन जोग (पुणे) http://www.instagram.com/chetan_jog1992 प्रसंग : ' तो ' सततच्या आर्थिक चणचण आणि वैयक्तिक अडचणी यामुळे आपल्या जीवनाला कंटाळून हे आयुष्य संपवायला निघालेला असतो. स्थळ : रेल्वे स्टेशन. वेळ : संध्याकाळी सहा वाजता. ( समोरून भरधाव वेगात रेल्वे येणार अशी सूचना मिळते. तो उडी मारणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजतो. अत्यंत रागीट मुद्रेने तो मोबाईल कडे पाहतो. ती गाडी निघून जाते. मग पुढील गाडी येईपर्यंत कोण आहे म्हणून तो फोन उचलतो. ) तो : हॅलो ?? ती : अरे कुठे आहेस तू ? मला असे समजले की तू हे जीवन संपवायला निघालेला आहेस ?? तो : होय. खर आहे हे. मी आजच हे जीवन संपवत आहे. त्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो पक्का झालेला आहे. ती : वेडा झालास का रे ?? इतके सुंदर आयुष्य देवाने आपल्याला दिलेले आहे आणि ते तू असेच व्यर्थ घालवणार आहेस का ? या जगात कोणाला दुःखे नाहीत रे; पण म्हणून काय प्रत्येकाने हाच एक मार्ग पत्करणे हे योग्य आहे का ? तो : मग मी काय करू ?? कोणासाठी जगायचं मी ? कोण आहे माझं या जगात ? ...

गो ग्रास :- एक कालवश होणारी संकल्पना

गोग्रास - एक कालवश होणारी संकल्पना चेतन जोग (पुणे) http://www.instagram.com/chetan_jog1992 गोग्रास !! बऱ्याच दिवसांपासून या विषयावर काहीतरी लेखन करावे असे माझ्या मनात होते. योगायोगाने विषय मिळाला त्यामुळे मी आज हा लेखनप्रपंच आपल्यापुढे मांडत आहे. सदर लेख हा चार मुख्य भागात विभागला आहे. १) गोग्रास ही संकल्पना २) याबाबत थोडी विस्तृत माहिती ३) एक छोटी आठवण ४) या विषयाचा दुसरा पैलू आणि तात्पर्य चला तर सुरुवात करूया. १) गो ग्रास ही संकल्पना :- गो ग्रास या नावातच या संकल्पनेचा अर्थ दडला आहे. गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे घास. गायीला घास देणे म्हणजे गो- ग्रास. यात अनेक पद्धती आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात ही प्रथा पूर्वापार पासून चालत आली आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोकण भागात आजही दुपारच्या भोजना अगोदर गायीला गोग्रास घालतात. यात मुख्य म्हणजे इतरांसाठी जे जेवण केले जाते त्याचाच लहान भाग व सोबत गायीसाठीचे थोडे खाणे असा समावेश असतो. एकदा गायीने हे खाल्ले की मग घरातील इतर सदस्य भोजनासाठी सुरुवात करतात. २) याबाबत थोडी विस्तृत माहिती :- भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये गाय ह...

संस्कारधन आणि मी

' शुभंकरोती कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दिपोज्योती नमोस्तूते ' तिन्हीसांजा झाल्या की गावाकडे वडीलधाऱ्या मंडळींची आणि घरातील स्त्रियांची देवाजवळ दिवा लावण्याची लगबग सुरू होते. देवासमोर निरांजन लावून सर्वांनी एकत्र बसून शुभंकरोती म्हणणे हा एक नियमच होता. अर्थात त्यामागे खूप सुंदर अर्थ होता. तिन्हीसांज ही अशी वेळ आहे की त्यावेळी श्री लक्ष्मीचा संचार असतो. अशा वेळी तिची आराधना आणि चिंतन करणारी घरे दिसली की तिचा वरदहस्त कायम त्या घरावर राहतो. लहान मुले ही खूपच संवेदनशील आणि अनुकरण करणारी असतात. त्यांच्यात आकलनशक्ती आणि पाठांतर करण्याची क्षमता तुलनेने मोठ्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे लहान असताना त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर पुढे याचा त्यांना खूप फायदा होतो. मोठ्यांशी नेहमी आदराने आणि नम्रपणे बोलावे, खरे बोलावे, ई. तर माझ्यावर देखील माझ्या आई आणि वडिलांनी हे संस्कार केले. त्याचा मला आज खूप फायदा होत आहे. मे महिन्यातील गोष्ट. उन्हाळी सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही सगळे आमच्या कोकणातील गावी फिरण्यासाठी आणि मजा म्हणून गेलो होतो. त्या वेळी मी फार तर ८ वर्षा...

माझ्या गावचा शिमगा

' होळी रे होळी, पुरणाची पोळी ' असा गजर करत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणारा सण म्हणजे शिमगा(होळी). मकरसंक्रांत झाली की सर्वांना वेध लागतात ते होळीचे. वातावरणात हवाहवासा वाटणारा गारवा मन सुखावून जातो. काही ठिकाणी हाच गारवा खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे ते होळीची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. होळी पेटली की त्या पेटत्या होळीने सगळे वातावरण छान उबदार होऊन जाते. प्रत्येक गावात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. याला शिमगा असेही म्हणतात. माझ्या गावचा शिमगा काहीसा वेगळाच आणि आनंद देणारा आहे. आधी माझ्या गावाबद्दल थोडेसे सांगतो. मी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नांदिवडे या गावचा. कोकण आणि शिमगा हे समीकरण फारच वेगळे आहे. आमच्या गावात हा सण होळी पौर्णिमा ते रंगपंचमी असा साजरा केला जातो. आम्ही सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण यात मुख्य आकर्षण असते ते ग्रामदेवतेच्या पालखीचे. कितीही कामे असली तरी शिमगा न चुकवणारे बरेच जण असतात त्यातलाच मी एक. विस्तीर्ण असा लाभलेला समुद्रकिनारा, नारळ आणि पोफळीच्या लांबच लांब पसरलेल्या बागा, आंब्याची झाडं,  हे सर्व सुख फक्त क...

किल्ले कोहोज- एक थरारक आणि रमणीय अनुभव

पावसाळा सुरु झाला कि साहजिकच त्या पावसाचा आनंद घेत भटकंती करायची म्हणून अनेक पर्यटक ट्रेकर्स यांची पावले गड,किल्ले यांच्याकडे वळतात. किल्ले कोहोज हा तसा अपरिचित पण पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मनोरी या डॉन गावलगतचा विस्तीर्ण असा किल्ला अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. या किल्ल्याला इतिहास तसा फारसा नाहीच पण तरीही या किल्ल्या बाबत सांगायचे म्हणजे :-       गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला. तर अशा या कोहोज किल्ल्याला भेट देण्याचा मानस ठरला.आयोजक होते - आमची वसई सामाजिक संस्था आणि ट्रेकिंग ग्रुप. दिवस ठरला २४ जुन २०१८ सकाळी ७ वाजता. जसे या ट्रेक साठी नोंदणीचे दिवस कमी राहिले तसे तब्बल १३० जणांनी पटापट पैसे जमा करून आपली नावे निश्चित केली. अखेर रविवारचा दिवस उजाडला. या ट्रेक साठी वसई आणि विरार दोन्ही ठि...

हरिश्चंद्रगड - एक अविस्मरणीय ट्रेक !!

Image
!!! हरिश्चंद्रगड !!!!       हे नाव जरी ऐकले तरी सह्याद्रीत भटकंती करणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, एक स्फूर्ती मिळते. प्रत्येक सह्याद्री वेडा या गडावर भ्रमंती (ट्रेकिंग) करण्याची मनिषा बाळगून असतो. या गडाला 'ट्रेकर्सची पंढरी' असे देखील संबोधले जाते. तर मित्रानो, या गडाचा इतिहास वाचून आणि अनेक ट्रेकर्सचे अनुभव ऐकून या गडाला आपण एकदा तरी भेट घ्यायचीच अशी अनिवार इच्छा निर्माण झाली. त्यासाठी मी तयारी सुरू केली होती. पण ही इच्छा पूर्ण होण्याचा दुग्धशर्करा योग इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. कारण ' आमची वसई ट्रेकर्स ' आणि ' सावे टूर्स आणि ट्रॅव्हल्स' यांच्या संयुक्त आयोजनाखाली आणि अनुभवी ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखाली " हरिश्चंद्रगड, जगप्रसिद्ध कोकणकडा,आणि अतिशय मनमोहक असा भंडारदरा येथील काजवा महोत्सव "  असा रात्रीचा ट्रेक आयोजित केला होता. त्याची सूचना व्हाट्सअप्प वर मिळाली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. दिवस ठरला दिनांक -2 जून 2018. मित्रानो, या गडाचा इतिहास खूप रंजक आहे तो बघूया, हरिश्चंद्रगड  हा ठाणे, पुणे आणि ...